ll हरी ॐ ll
प. पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंना श्रद्धावानांकडून अपेक्षित असलेल्या नऊ गोष्टी :
( अग्रलेख : दै. 'प्रत्यक्ष' दि. ३० ऑगष्ट २००९):
(१) आन्हिक दररोज दोन वेळा करणे.
(२) आन्हिक, रामरक्षा, सद्गुरु गायत्री मंत्र (अनिरुद्ध गायत्री मंत्र), सद्गुरु चालीसा (अनिरुद्ध चालीसा), हनुमान चालीसा व दत्तबावनि तोंडपाठ असणे व पुस्तकात न बघता म्हणता येणे. चार महिन्यातून कमीत कमी एक रामनाम वही पूर्ण करणे व रामनाम बँकेत जमा करणे.
(३) बरोबरच्या व हाताखालच्या सहकाऱ्यांशी उन्मत्तपणे व उद्धटपणे न वागणे, सहकाऱ्यांची किंवा हाताखालील व्यक्तिंची चुक झाल्यास त्यांना जरुर त्याबद्दल ताकीद द्यावी परंतु अपमान करू नये.
(४) उपासनांच्या वेळेस त्या स्थळी असणाऱ्या प्रत्त्येकाने ' आपण उपासनांच्या वर आहोत किंवा आपल्यास उपासनांची आवश्यकता नाही' असे वर्तन करू नये.
(५) बोलण्यापेक्षा , बडबडीपेक्षा कोण भक्ती व सेवेच्या कार्यक्रमात किती जीव ओतून सहभागी होतो हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.
(६) ह्या विश्वामधे कुणीही मानव 'आपण एकमेव अद्वितीय आहोत व आपली जागा दूसरा कुणीही घेऊ शकत नाही किंवा आपल्यासारखे कार्य करू शकत नाही' असे म्हणु शकत नाही व असे कुणीही मानु नये.
(७) श्रद्धावानांच्या नऊ समान निष्ठा त्याला मान्य असल्याच पाहिजेत व त्याच्या आचरणातही असल्याच पाहिजेत.
(८) चुक झाल्यास चुक सुधारण्याची तयारी पाहिजे.
(९) परपीड़ा कधीच करता कामा नये.
माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपल्यासमोर श्रीरामचरिताचाच आदर्श असला पाहिजे व त्यामुळे 'पावित्र्य हेच प्रमाण' ह्याच मुलभुत सिद्धांता नुसार प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व वरील नऊ गोष्टी ज्याच्याकड़े नाहीत, तो माझ्या जवळचाच काय, परंतु दुरान्वयाने संबंध असणाराही असू शकत नाही, हा माझा ठाम निश्चय आहे. तुमच्या हातात मी आज 'मला काय आवडते व काय आवडत नाही' ह्याचा निश्चित मापदंड दिलेला आहे व हे मापदंड वापरुनच माझ्याशी निगडित असणारे प्रत्येक कार्य व यंत्रणा राबविले गेले पाहिजेत.
ll अनिरुद्ध. ll
No comments:
Post a Comment