Tuesday, 25 November 2014

श्रीवर्धमान व्रताधिराज

"     श्रीवर्धमान व्रताधिराज  "

'श्रीवर्धमान व्रताधिराज ' म्हणजे यच्चयावत् ,यावच्चंद्रदिवाकरो सर्व व्रतांचा मुकुटमणि .
श्रीवर्धमान व्रताधिराजाचे पालन दरवर्षी करणा-या  व्यक्तिस  इतर कुठ्ल्याही  व्रताची मुळी गरजच उरत नाही आणि त्याचबरोबर हेही सत्य आहे की श्रीवर्धमान करणा-या  व्यक्तिस इतर कुठल्याही प्रकारची व्रते केल्यास त्याचे दश्गुणा पुण्य व लाभ प्राप्त होतात.
   श्रीवर्धमान व्रताधिराज  म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही .
   श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे सर्वसामान्यांपासुन संतांपर्यंत , अशिक्षितांपासुन उच्चशिक्षितांपर्यंत, महापाप्यांपासुन पुण्यवंतांपर्यंत, प्रत्येकाला समानपणे भगवतकृपेचा आधार व दुःखमय प्रारब्धाचा नाश प्राप्त करुन देणारे सर्वोच्च व्रत होय.
   कलियुगातील ह्यापुढील संपुर्ण कालावधीसाठी  श्रीवर्धमान व्रताधिराज एकदाही न करणा-या व्यक्तिस जीवनसार्थक्य कधीही प्राप्त होऊ शकणार नाही .
     सर्व प्रकारच्या व्रतांचे सर्व प्रकारचे लाभ फक्त ह्या सर्वोच्च व्रताने प्राप्त होतात.
   श्रीवर्धमान व्रताधिराजचे ज्याने आपल्या आयुष्यात वयाच्या अठराव्या वर्षापासुन ( अठरा वर्ष पूर्ण ) देहपतनापर्यंत दरवर्षी पालन केले आहे अशी व्यक्ति भगवंताच्या भर्गलोकात थेट प्रवेश मिळविते. ह्यासच  ' सामीप्य ' असे म्हणतात .
भर्गलोकात एकदा प्रवेश मिळालेल्या जीवात्म्याचे परत कधीही पतन होत नाही व त्याचे पुढील जन्मही सुखद , पवित्र  व मंगलमय असतात व त्याच्या पुर्नजन्माचे कारण  त्याचे प्रारब्ध न राहता भगवंताच्या इच्छेने भगवंताचे कार्य करणे हेच असते .
   ह्या भर्गलोकासच  " गोकुळ " , ' गोलोक ' किंवा  ' परमात्म्याचा प्रेमलोक ' असे म्हणतात .  श्रीवर्धमान व्रताधिराजाचे आपल्या आयुष्यात कमीतकमी २४ वेळा किंवा अठराव्या वर्षापासुन मृत्युपर्यंतच्या वर्षाच्या संख्येच्या निम्म्या संख्येइतकेवेळा पालन करणारी व्यक्ति जन्मभर अधिकाधिक पुण्यवान व सुखी बनतेच परंतु त्यास शांती व  तृप्ती सदैव प्राप्त होतात . अशी व्यक्ति देहपतनानंतर ओजलोकात निवास करते  व पुढील जन्मात अधिकाधिक सुंदर परमार्थ करण्यासाठी पात्र होते.
   संपुर्ण आयुष्यात कमीतकमी ९ वेळा किंवा आयुष्यवर्षसंख्येच्या एक चतुर्थांश संख्येइतके व्रतपालन करणा-या व्यक्तिच्या पंचमहापापांचे निरसन होते व त्यास देहपतनानंतर यज्ञलोकाची प्राप्ती  होते . यज्ञलोकात त्यांना पुढील प्रगतीसाठी ज्ञानसामर्थ्य देऊन मगच भूलोकी परत जन्म दिला जातो व त्यामुळे अशा व्यक्ति पुढील जन्मात श्रीमंत , संपन्न व सुसंस्कृत पुरुषार्थी घरात जन्माला येतात .
   ज्या व्यक्तिने संपुर्ण  आयुष्यात कमीतकमी  एकदा तरी मनःपूर्वक व्रताधिराजाचे पालन केले आहे, त्याच्या मार्गातील दुःखद घटनांचे दुःखदत्व कमी होते आणि देहपतनानंतर त्यास तपोलोकात प्रवेश मिळतो .
  ज्या व्यक्तिने संपुर्ण आयुष्यात एकदाही व्रताधिराजाचे पालन केले नाही तर त्यास अंतरिक्षलोकात प्रवेश  मिळतो व तेथुन लगेचच परत भूलोकी आपले प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म दिला जातो .
  एकापेक्षा जेवढ्या म्हणुन अधिकवेळा ह्या सांवत्सरिक व्रताधिराजाचे पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात मनुष्य ह्या भूलोकात अधिकाधिक सुखप्राप्ती व दुःखनिवृत्ती मिळवितो  व परलोकातही अधिकाधिक वरची  श्रेणी प्राप्त करतो.

                    मी अंबज्ञ आहे

No comments:

Post a Comment

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.

गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.  ।। हरी ओम   ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...